महाराष्ट्र

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात मोजक्या शेतकऱ्यांनाच  खरीप पिक विमा , भोई समाज सेनेचा आंदोलनाचा इशारा

 

भोकरदन / जालना (प्रतिनिधी ) जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात मोजक्या शेतकऱ्यांनाच  खरीप(2024-25) पिक विमा मिळाला असून
उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे बाबत कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांना शेतकऱ्यांच्या वतीने   अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ मोरे, किसन मिमरोट,
सोमिनाथ खडेकर यांनी निवेदन दिले.
हसनाबाद व परिसरातील शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला आहे याबाबत असे की हवे तसे उत्पन्न शेतीत झाले नाही व त्यात पीक विमा कंपन्याची मनमानी सुरू आहे हसनाबाद व परिसरातील काही मोजक्या शेतकऱ्यांनाच खरीप (2024-25) पिक विमा लाभ मिळाला उर्वरित शेतकरी विम्याची वाट पाहत आहे आज येईल उद्या येईल परंतु अध्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम आलीच नाही काहींना मिळाला काही म्हणजे जवळजवळ 80 टक्के लोक पिक विमा रकमेपासून वंचित आहेत बँकेच्या चकरा मारू मारू शेतकरी हबकला असून खात्यावर पिक विम्याची रक्कम आलीच नाही
शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.पिक विमा शासनाला किंवा विमा कंपन्यांना द्यायचाच होता तर
सरसकट का दिला नाही हा दूजाभाव का केला असा सवालही शेतकरी वर्ग करीत आहे.शासनाने याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याकरिता पिक विमा कंपन्यांना आदेश द्यावे अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
या करिता भोकरदन तालुका कृषी अधिकारी भुते यांनी  शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी करत 
नसता शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ उत्तमराव मोरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button