राजकीय

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – १ ऑगष्ट २०२४ रोजी सुप्रिम कोर्टाने एससी, एसटी मध्ये वर्गीकरण करने आणि क्रिमीलिअर लावणे अशा प्रकारचा आदेश राज्यांना दिलेला असुन सुप्रिम कोर्टाच्या माध्यमातून हा एससी, एसटीचे आरक्षण संपविण्याचा डाव ईथल्या व्यवस्थेने आखलेला आहे. या बाबतची जनजागृती लोकांमध्ये व्हावा आणि त्याच प्रमाणे ओबीसी बांधवाचे आरक्षण सुध्दा संपण्याच्या मार्गावर आहे त्यांना ही जागृत करावा आणि महत्वाचे या विषयावर सत्ताधारी पक्षा आणि विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याने आपले मत व्यक्त केलेले नाही. अॅड बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीची भुमिका सुरवातीच्या काळापासून अगदी स्पष्ट आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावा आणि ओबीसीचे ताट वेगळे असावे या बाबत ठोस भुमिका फक्त वंचित बहुजन आघाडीनेच घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन दंगली घडविण्याचा कट रचण्यात आला होता. तो मोडून काढण्यासाठी महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर चार हजार कि.मी.चा प्रवास करुन आरक्षण बचाव यात्रा काढली. आणि एससी, एसटी, व ओबीसी यांचे आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हयामध्ये आरक्षण बचाव यात्रेची सभा घेण्यात आली. आरक्षण संपविण्याचा कट इथल्या व्यवस्थेने आखलेले असतांना या सर्व समाजामध्ये जन जागृती व्हावी, जनतेला सत्य कळावे या हेतुने रविवार दि.०८ सप्टेंबर रोजी अक्कलकोटच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील गांवामध्ये जन संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची सुरुवात अक्कलकोट भिमनगर पासुन  शहरातील प्रमुख मार्गावरुन या यात्रेचे रॅली ने हसापूर येथे समारोप होईल. या यात्रेमध्ये एससी, एसटी, ओबीसी व गरीब मराठा आणि सर्व आरक्षणवादयांनी मोठया
संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे  यांनी  केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button