सामाजिक

अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष -पालकमंत्री जयकुमार गोरे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सुविद्य पत्नी सोनिया जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोलबापू शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, आनंदराव तानवडे, शिवशरण जोजन, वहिदपाशा शेख, महेश हिंडोळे, मल्लिनाथ स्वामी, शिवराज स्वामी, ननु कोरबू, बसवंतराव कलशेट्टी, लखन झंपले, संतोष पाटील, आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहायक धनंजय गाढवे उपस्थित होते.  
पुढे बोलताना ना.जयकुमार गोरे म्हणाले, अन्नछत्र मंडळ रुपी वटवृक्ष समाजाला उर्जावान बनवित आहे. श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचा दीपस्तंभ असून, धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या विविध क्षेत्रातील कार्याने राज्यातच नव्हे तर देशभरात, परदेशात अन्नछत्र मंडळाचे नांव पोहचेल आहे. तालुक्यातील ७७ कुस्तीगीरांना दरमहा वजन गटानुसार देण्यात येणारा प्रसादरुपी खुराक या योजनेसह दिव्यांग, निराधार यांना समर्थ महाप्रसाद सेवा दिली जाते ही बाब राज्यातील अन्य धर्मादाय संस्था पहायला मिळत नाही, मात्र गरजा ओळखून भोसले पिता- पुत्राकडून अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्त सेवेतून समाजसेवा घडत असल्याचे ना. गोरे यांनी सांगून एकाच क्षताखाली अन्नछत्र प्रगतीचे पाउल टाकत आहे. राज्यातील अन्य धर्माधाय संस्थाना अन्नछत्राचे कार्य अनुकरणीय असल्याचे ना. जयकुमार गोरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button