अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस गावातील माजी पोलीस पाटील वयोवृद्ध व्यक्ती मच्छिंद्र मलकप्पा गायकवाड (वय ७६ वर्षे )हे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मोठा मुलगा भीमा गायकवाड राहणार मुंबई यांच्याकडे जात आहे असे सांगून मुंबईला गेले आहेत. मच्छिंद्र गायकवाड हे मुंबईला त्यांच्या मुलाकडे गेले नाहीत तसेच ते अद्याप घरी आले नाहीत. या प्रकरणी वयोवृद्ध मच्छिंद्र गायकवाड हे हरवल्याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सदरील व्यक्ती कोणास आढळल्यास ९८६०७८४७५१ ,९१७२१२४३४५ ,७०४०४०१९५८ ,८६९८८५९६४२ या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Oplus_131072