यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बारावी कला व वाणिज्य वर्गाचा निरोप समारंभ संपन्न

करमाळा – ( आयुब शेख ) येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील 12 वी कला व वाणिज्य वर्गांचा निरोप समारंभ महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक उपस्थित होते. या निरोप समारंभ प्रसंगी इयत्ता बारावी कॉमर्स मधील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान करून आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अमृता सांगळे,प्रज्वल मोरे, कुमारी वैष्णवी खोमणे, कुमारी संस्कृती काळे, कुमारी सानिका देशमाने, कुमारी श्रावणी शिंदे, रोहन थोरवे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दोन वर्षांमध्ये महाविद्यालयात आलेले वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. भौतिक सुविधा बरोबरच ज्ञानाने संपन्न असणारे शिक्षकांनी आमच्यावर कशा पद्धतीचे संस्कार केले हे आपल्या मनोगतातून या विद्यार्थ्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील मुलांना महाविद्यालयाच्या माध्यमातून वाणिज्य शाखेद्वारे नोकरी व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न असावे. त्याचबरोबर प्रा.सौ. संध्या बिले मॅडम यांनी आपल्या मनोगतात वाणिज्य शाखेतून नोकरी व व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. याविषयी माहिती सांगितली तसेच महाविद्यालयातील शिदोरीचा उपयोग भावी आयुष्यासाठी नक्की करून घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले. त्यानंतर सौ. सुरेखा जाधव मॅडम यांनी मोठी स्वप्ने मोठी ध्येय ठेऊन ती सत्यात उतरवण्यासाठी जिद्द, चिकाटी घेऊन सक्षम बनले पाहिजे. मुलींनी न डगमगता निर्भयपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे असे सांगितले. तर प्रा.जाधव एम.डी. यांनी जीवनात अर्थशास्त्राचे असणारे महत्त्व विविध उदाहरणाच्या साह्याने पटवून दिले व अर्थशास्त्र माणसाच्या जीवनात किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. यानंतर अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी आपल्या महाविद्यालयात असणाऱ्या विविध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन आपल्या आयुष्यातील यशाचे शिखर गाठावे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत गुणवत्ते बरोबरच संस्कार ,परंपरा व चारित्र्य महत्त्वाचे असते असे सांगितले. या कार्यक्रमाला इयत्ता 12 वी कला व वाणिज्य मधील सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सायली साळुंखे व कुमारी प्रतीक्षा तरंगे यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी निकिता शेळके हिने केले. अध्यक्ष सूचनेला कुमार शितल जाधव हिने अनुमोदन दिले. या कार्यक्रमाचे आभार कुमारी सानिका भोगे हिने मानले.