सामाजिक
परभणी घटनेचा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने जाहिर निषेध

अक्कलकोट ( प्रतिनिधी )दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी महाराष्ट्र येथे घटनेचे शिल्पकार . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोरील भारताच्या संविधानाचे जे शिल्प उभारले होते. ते शिल्प फोडण्यात आले. ते भरदिवसा करण्यात आले या घटनेचा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने जाहिर निषेध करण्यात आला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
वास्तविक पाहता महाराष्ट्रातील सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पोलीसांचे २४ तास संरक्षण असते मग परभणी येथील पुतळयाला पोलीस संरक्षण दिले होते का नाही. दिले नसेल तर ते कोणी दिले नाही व दिले असेल तर तेथील ड्युटीवर असलेला पोलीस तेथे नव्हता काय ? व तो असेल तर हा प्रकार होताना तो गप्प बसला काय ? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये मागिल काही वर्षांमध्ये प.पु. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयाची विटंबना झाली आहे. तेथे सरकारचे व तेथील पोलीस प्रशासनाचे लागलीच विटंबना करणारा हा माथेफिरु आहे किंवा तो वेडा आहे असे जाहिर करुन झालेल्या प्रकरणावर पडदा घालण्याचा जाणून बुजुन प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
परभणीच्या घटनेमध्ये भारताच्या संविधानाचे शिल्प तोडण्यात आले. हा राष्ट्रदोहाचा गुन्हा नाही का ? असेल तर या बाबत शिघ्र न्यायालयामध्ये याची सुनावणी झाली पाहिजे व कायद्यात असलेल्या सर्वोच्च शिक्षेचे त्यास शिक्षा झाली पाहिजे तरच महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत घडणाऱ्या घटनेवर अंकुश बसेल असे आम्हांला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत घडणाऱ्या विकृत घटनेबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेत व विधान परिषदेमध्ये कठोर कायदा व्हावा. अशी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ वतीने मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने देण्यात आला. यावेळी
अविनाश आठवले (जिल्हा अध्यक्ष ) ,संदीप वाघमारे (जिल्हा संपर्क प्रमुख ) ,भागप्पा आर प्रसन्न ( सोलापूर शहर अध्यक्ष ) ,श्रीकांत कांबळे. ( जिल्हा उपाध्यक्ष) ,अंकुश बनसोडे (जिल्हा उपाध्यक्ष )
सुखदेव भालेराव (शहर सचिव ) ,प्रशांत गायकवाड (शहर खजीनदार ) आदी उपस्थित होते.