बौध्द लेणीचे अतीक्रमन हटवण्याची नोटिस देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मानवत / परभणी (मुस्तखीम बेलदार )
खोडसाळपनाने बौध्द लेणीचे अतीक्रमन हटवा अशी नोटीस बौध्द विहाराला चिटकविणाऱ्या जातीवादी बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मंगेश जगताप यानां तात्काळ पदावरुन हटवून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन दि.३० सप्टेंबर रोजी तहसीलदार, तहसील कार्यालय मानवत यांच्यां मार्फत
मा. उपमुख्यमंञी अजितदादा पवार तथा देवेंद्रजी फडणवीस मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई ,पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांना मानवत येथील बौध्द समाजबांधवाच्या वतिने निवेदन देण्यात आले आहे.
७० वर्षापासून बौध्द लेणीच्या पायथ्यशी असलेल्या बुध्द विहार अतिक्रमन आहे ते निष्कातीत करणारा आदेश विपश्यना बौध्द विहार येथे लावण्यात आला. या मुळे बौध्द समाजाच्या भावणा दुखावल्या आहेत, या पवित्र स्थळाला खोडसळपणाने अतिक्रमन संबोधीत करुन कायदा व सुव्यस्था बीगडविण्याचे काम पोलीस निरिक्षक मंगेश जगताप यानी केला आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मंगेश जगताप यांना तात्काळ पदमुक्त करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबादारी प्रशासनावर राहिल असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनावर दिपक ठेंगे ,रविभाऊ पंडित ,छगन भदर्गे ,प्रेम रणखांबे ,उत्तम गायकवाड ,नागसेन भदर्गे ,मुकेश खराटे,आशिष धबडगे ,आनंद वाघमारे,शरद कांबळे आदी बौध्द समाज बांधवाच्या स्वाक्षरी आहे.