टॉप न्यूज
अक्कलकोट वागदरी रोडवर वेडीवाकडी वळणामुळे वारंवार होतात अपघात , रस्त्यात खड्डेच खड्डे !

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील वागदरी रस्त्यावर डांबर उखडून खड्डे पडल्याने वाहनचालकांना यांचा नाहक त्रास होत असून, विशेष धक्कदायक बाबा म्हणजे या रस्त्याला सतरा साठ ब्रेकर असून, आणि कित्येक धोकादायक वेडीवाकडी वळणे आहेत. या वेडी वाकड्या वळचा अंदाज नवीन वाहन चालकांना येत नसल्याने आतापर्यंत कित्येकांना या अक्कलकोट वागदरी रोडवर जीव गमावावं लागला असून, या घटना वारंवार घडतात. पण या गंभीर घटनेची कोणीच दाखल घेत नाही.
वेडी वाकडी वळणे व सतरा साठ ब्रेकराचा संध्याकाळी च्या वेळी व दिवसा देखील वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत. पण गाडी जवळ जाताच हे ब्रेकर व वळणे दिसतात. अचानक पणे गाडी नियंत्रित करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत असून, यापूर्वी कित्येकांचा बळी या रोडवर गेलाय पण राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी केवळ झोपेचे सोंग घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा स्वरूप आपणास वारंवार पाहायला मिळत आहे.
आतापर्यत 20 जण या रोडवर मृत्युंमुखी पडले असून, या मृत्यूला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर गुन्हा करण्याची मागणी मराठा सेवा संघांचे जिल्हाकार्यकारणी सदस्य प्रवीण घाटगे यांनी केली असून, हा अक्कलकोट वागदरी रस्ता तात्काळ दुरुस्त होऊन या रोडवरील बेकायदेशीर ब्रेकर काढून आवश्यक त्या ठिकाणी ब्रेकर करण्यात यावे व अक्कलकोट वागदरी हा रस्ता सा बा विभागाच्या आखतरीत होता पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्याकडे हस्तातरीत करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत असून, आणखीन किती बळी गेल्यावर हा रस्ता होणार आहे…? असा सवाल नागरिकांतुन विचारला जात आहे.
अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठावाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जातं असून या रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. या सांगवी बु पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात आत्तपर्यंत 30 ते 40 जण पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यातच एका महिलेचे मृत्यू झाले आहे. अशा गंभीर घटना वेळोवेळी घडत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग हे झोपेचे सोंग घेत आहे. जर येत्या आठवड्याभरात हा अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय महामार्गची दुरुस्ती न केल्यास सांगवी बु सह पंचक्रोशीतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची चर्चा खेडपाड्यात रंगली आहे.
