अक्कलकोट ( प्रतिनिधी ) जयहिंद_फूडबँक_शाखा_मिरज_व_सांगली चे मिरज सिव्हील हॉस्पिटल चे डीन डॉ प्रकाश गुरव यांच्या हस्ते अन्न दान करून उद्घाटन करण्यात आले.
15 ऑगस्ट भारत स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून मिरज येथे हि आपल्या जयहिंद फूडबँक च्या कार्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे होत आहेत पण आज ही भारतात दर दिवशी 3000 लोक हे उपासमारीने मृत्यू होत असतात, या उपासमारी पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्या साठी भूक मुक्त भारत ही चळवळ जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून उभा करण्यात येत आहे.
गरजूं व गरिबां साठी त्याची भूक मिटवण्याच्या उद्देशाने जेवणा च्या स्वरूपात संजीवनी पोहचवण्याच आम्ही कार्य करत आहोत.
अन्नपूर्णा फाऊंडेशन संचालित जय हिंद फूड बँक ही संस्था 2013 साली सोलापूर या ठिकाणी सुरूवात झाली होती तसेच या संस्थे चे कार्य 3 राज्यात चालू आहे.
या संस्थेच्या माध्यमातून अन्न, पाणी, शिक्षण, महिला सबलीकरण, या विविध क्षेत्रात सेवा चालू आहे.
मिरज व सांगली च्या सर्व सदस्यांच मला सार्थ अभिमान आहे, त्यानी केलेली ही धाडस नक्कीच आपण अनेक भूकबळी थांबवू शकतो.
आणि एक पाऊल भुक_मुक्त_भारत” साठी पडत आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम व नियोजन प्रस्तावना जयहिंद फूडबँक चे संस्थापक अध्यक्ष सतिश सुरेश तमशेट्टी यांनी केले तर आभार प्रवीण पाटील यांनी केले.
जेवणाचे स्वरूप पुलाव, जिलेबी, बिस्कीट
या वेळी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माननिय डीन डॉ प्रकाश गुरव सर, वैद्यकीय अधिकारी डॉ माने, प्रशासकीय अधिकारी माळी , अधीसेविका वंदना शहाणे, समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच शाखा सांगली व मिरज चे प्रमुख प्रवीण पाटील, अनिकेत बाबर संकेत संदत्ते, प्रवीण वसगडे, निलेश मांडले, रुपेश कांबळे व संस्थेचे संस्थापक सतीश तमशेट्टी, अनिकेत सरवदे, रोहित जन्नु, विपुल पूल्ली, सागर कुरापाटी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत उपक्रम राबवण्यात आला.Oplus_131072