जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात सोडा.. भाई अँड नारायण गोले पाटील

माजलगाव ( प्रतिनिधी ) जायकवाडी धरणात एक लाख क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून आज रोजी जायकवाडी धरण जवळपास ५० टक्के भरलेले असून उर्वरित ५० टक्के धरण काही दिवसातच भरेल अशी परिस्थिती असताना माजलगाव धरणात केवळ मृत साठा असल्याने जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात सोडण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी केली आहे.
पावसाळा केवळ एक महिना शिल्लक असतानाही माजलगाव धरणात मरत साठा शिल्लक आहे याउलट जायकवाडी धरणात आज रोजी जवळजवळ ५० टक्के पाणीसाठा असून १००००० क्युसेक्स ने पाण्याची आवक सुरू आहे यावरून काही दिवसातच जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्यास सारखी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरण १००% भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्याची स्थिती निर्माण होते त्यामुळे आणि माजलगाव धरणात मृत साठा असल्यामुळे उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यास माजलगाव सह आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये तसेच गुरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माजलगाव धरणात जायकवाडीतून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार माजलगाव यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे केली असून माजलगाव धरणात जायकवाडीचे पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील, भाई राहुल सोळंके, भरत सोळंके, भाई मुंजा पांचाळ, भाई विष्णू शेळके, भाई अशोक कुलकर्णी, भाई अनंत चव्हाण,भाई सतीश शेजुळ, भाई चांगदेव शेजुळ, भाई साळूजी हांडे, भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, भाई भास्कर कांबळे, भाई राजेश्वर मोरे, माय माऊली चंदनशिव, भाई सुदाम चव्हाण, श्रीराम शेवाळे, जनार्दन कुदळे, भाई गणेश सोनटक्के यांच्यासह आदींनी दिला आहे.