शेतकऱ्याला उध्वस्त करणाऱ्या सरकारला जाब विचारा.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) गेल्या दहा वर्षात शेतकरी पूर्णता नागवला असताना शासन शेतकऱ्याचे कर्जमाफी करू शकलेले नाही तसेच २०२० व २३-२४ सालचा पिक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला किपायात शिर हमीभावाचा प्रश्न अनेक दशकापासून प्रलंबित असून त्याकडे राज्यकर्त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून शेतकऱ्याला उध्वस्त करणाऱ्या सरकारला जॉब विचारण्यासाठी ०९ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी मंगरूळ नं.१ सावरगाव, फुले पिंपळगाव, हरकी निमगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव मतदार संघात शेतकरी संवाद दौरा सुरू असुन या मध्ये
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ मिळालाच पाहिजे, उसाचे गेल्या
दोन वर्षाचे राहिलेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाले पाहीजे.. पि एम किसान यौजने पासुन वंचित शेतकर्यांचा सदर यौजनेत तत्काळ समावेश केला पाहीजे..शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव दिला पाहिजे.बि-बियाणांच्या व खतांच्या वाढत्या किमती तात्काळ कमी झाले पाहिजे..माजलगाव तालुक्यातील सर्वच पांदन रस्त्याचे मुरुम- खडीकरण झाले पाहिजे.. लोकनेते कारखान्याने शेवटच्या ११दिवसाच्या काळातील गाळप केलेल्या ऊसाचे बिल तात्काळ अदा झाले पाहिजे सह अनेक प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई ॲड.नारायण गोले पाटिल, यांनी दि.०५ऑगस्ट रोजी सावरगाव,फुले पिंपळगाव,हरकी निमगाव,मंगरुळ नंबर १ येथे शेतकऱ्याला उध्वस्त करणाऱ्या सरकारला जॉब विचारण्यासाठी ०९ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी मंगरूळ नं.१ सावरगाव, फुले पिंपळगाव, हरकी निमगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.