टॉप न्यूज

पावसाने ओढ दिल्याने अक्कलकोट तालुक्यात चिंतेचे वातावरण 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी बांधवातून चिंता व्यक्त केली जात आहे. दोन चार दिवसात पाऊस न आल्यास याचा खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 अक्कलकोट तालुक्यात जून महिन्यात मृग नक्षत्राचा दमदार पावसामुळे खरीप पेरणी करण्यात आली. यामध्ये तूर सोयाबीन मूग उडीद या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सध्या अक्कलकोट तालुक्यात खरीप पिके जोमात आली असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पण पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या खरीप पिकांना पावसाची गरज आहे. जर दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास पिके वाळून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता असून यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अक्कलकोट तालुक्यात शेतातील कोळपणी करण्यात येत असून शेतातील गवत तण काढण्याचे काम शेतकरी करत आहेत. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा सर्वानाच लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button