सामाजिक

संत कबीर यांनी सामाजिक समतेसाठी काम केले – दिलीप कदम

अक्कलकोट: (प्रतिनिधी) राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने  समतावादी , मानवतावादी संत शिरोमणी  संत कबीर यांची १४४० वी जयंती राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे ,शिवपुत्र घटकांबळे (राज्य उपाध्यक्ष यश  सिद्धी आजी माजी सैनिक संघटना असोसिएशन ) रिझर्व्ह बँकेचे माजी मॅनेंजर तथा राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय संस्थापक अध्यक्ष  दिलीप कदम पत्रकार स्वामीराव गायकवाड , दिलीप शिवशरण (सिव्हिल इंजिनिअर ). श्रीशैल शिवशरण, .सिद्धाराम घटकांबळे,.वसंत शिवशरण , शिवशंकर गुंजले आदीचीं प्रमुख  उपस्थित होती. उपस्थिताच्यां हस्ते संत कबीर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना दिलीप कदम म्हणाले संत कबीर यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक समतेसाठी लढा दिला होता. आपल्या साहित्यातून तत्कालीन समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी वैचारिक आंदोलन केले होते. संत कबीर यांच्या दोह्यातून समता स्वातंत्र्य बंधुता यावर प्रकाश टाकण्यात आला होता .जातिवाद धर्मवाद यावर संत कबीर यांनी टीका करत बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम केले होते.विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीर यांना आपले गुरु म्हणून मानले होते असे सांगितले. यावेळी सेवानिवृत्त सैनिक शिवपुत्र घटकाबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button