महाराष्ट्र

जिर्ण झालेले विद्युत पोल तात्काळ बदला :- नुमान चाऊस

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी )माजलगाव शहरातील विविध भागातील विद्युत वाहक पोल हे जिर्ण झाले आहेत. त्यामुळे ते कोसळून जिवीत हानी होऊ शकते. त्या करीता विज महावितरण कंपनीने हे जिर्ण झालेले विद्युत पोल बदलून पर्यायी पोल उभरावे अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे.
माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातील विद्युत पोल हे अनेक पर्षापासून बदलण्यात न आल्याने ते जिर्ण झालेले आहेत. त्यामुळे वाकडे पोल केंव्हाही कोसळून जिवीत हानी होऊ शकते. त्यामुळे प्रामुख्याने माजलगाव शहरातील मोगल मोहल्ला व अरब गल्ली इतर वार्डातले भागात विज वाहक पोल हे जमिन लेवलला जिर्ण झाले असून ते धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. परंतू महावितरण कंपनीला या विद्युत वाहक पोल बदलने व जिर्ण झालेल्या तारा बदलण्यात कसल्याच प्रकारे कर्तव्य जाणून येत नाही. तरी तात्काळ महावितरण कंपनीने हे जिर्ण झालेले विद्युत पोल बदलावेत अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास या सर्व प्रकारास महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार कारणीभूत ठरणार आहे. तात्काळ हे पोल बदलावे व भविष्यात होणारी जिवीत हानी व अनुचित प्रकार महावितरण कंपनीने टाळावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button