सामाजिक
पर्यावरणाच संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण ना चालना दिल पाहिजे:- -तहसीलदार विनायक मगर

अक्कलकोट ( प्रतिनिधी )- पर्यावरणाच्या संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्षारोपण केल्यावर उद्याचं भविष्य उज्वल आहे. अन्यथा आपल्याला ग्लोबल वार्मिंग च्या प्रश्नाला सामोरे जावं लागणार आहे. यासाठी वृक्षारोपणाला अधिक विचारणा देणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर यांनी. हन्नूर येथील 251 वृक्षारोपण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते. नवीन बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथील. श्रावण निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून. गटविकास अधिकारी शंकर कवितके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य गौतम बाळशंकर यांनी केली. यावेळी सरपंच सोनाली तळवार उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य जयश्री भरमशेट्टी, शैलेश पाटील ग्रामविकास अधिकारी सी एल थोरात, माजी उपसरपंच शरणापा हेगडे, तंटामुक्त अध्यक्ष सिद्राम पुजारी, ज्येष्ठ नागरिक शिवाप्पा भरमशेट्टी, अनिल तलवार, अंगणवाडी सेविका ज्योती बाळशंकर, नयाबाई बाळशंकर,आदी यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. ग्रामपंचायत सदस्य गौतम बाळशंकर यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी सी एल थोरात यांनी केली.