सोलापूर

परभणी हिंसाचाराची सी.बी.आय चौकशी करण्यात यावी – रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे

 

सोलापूर ( प्रतिनिधी ) – परभणी या ठिकाणी मुख्य चौकात असलेल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूने केली.त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.या अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली आहे या आंदोलनात विधी या शैक्षणीक वर्षा मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलिस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष .रामदास आठवले यांच्या आदेशा नुसार आज राज्यामध्ये सर्वत्र रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर निषेध आंदोलन घेण्यात आले.

सोलापूर शहर या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या शहीद भीमसैनिकास भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद येथे पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आले.
परभणी येथील आंदोलनानंतर बौध्द वस्तीत भिमनगर, प्रियदर्शीनगर इत्यादी विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबींग ऑपरेशन करून बौध्द बांधवांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली.सोबतच त्यांच्या घराची,मोटार सायकली, कारची पोलीसांनी आणि त्यांच्या भाडोत्री गूंडांनी नुकसान केले.अनेक निष्पाप नागरिकांना पोलीसांनी बेकायदेशीर अटक केल्याचे समजते.अनेक महिलांना आणि शालेय, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वरील सर्व प्रकरणाची सी.बी.आय.मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व पोलीस गुंडांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी के.डी.कांबळे,अतुल नागटिळक,पवन थोरात,राजेश उबाळे,शामसुंदर गायकवाड,अविनाश मडीखांबे,शाम धुरी, सुशील सरवदे,सोमनाथ घोडकुंबे,शिवा गायकवाड, विकास सरवदे,अमोल वामने,यशवंत माने,सदैप्पा झळकी,सतीश शिंदे,सुग्रीव जेठीथोर,आनंद जानराव,राजू गुल्लापल्ली, बसवराज सोनकांबळे,शिवा उबाळे,समीर नदाफ,किशोर शिंदे,श्रीनिवास सरवदे,महादेव बाबरे,प्रभाकर शहापुरे, सिद्धार्थ बनसोडे,शिवम सोनकांबळे,सचिन गायकवाड, बापू सदाफुले,प्रबुद्धकुमार दोड्यानुर,विशाल कांबळे,उपगुप्त चौधरी,राहुल वाळके,बंटी घाडगे,दावला सुर्वे,दत्ता कांबळे,कालिदास दीलपाक,जानाप्पा कांबळे,गोविंद तळभंडारे,सचिन ढेपे,सचिन कांबळे,विकास चव्हाण,संजय गायकवाड,सचिन शिंदे,शितल कांबळे,बापू शिवशरण,हनुमंत वाघमारे,अनिल बोराळे,राहुल गाडे,अक्षय चंदनशिवे,हरीश जाधव,कुणाल वाघमारे,पप्पू गायकवाड,बापू कापुरे,संतोष गायकवाड,कुणाल मस्के,मयूर क्षीरसागर,विशाल कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button