सामाजिक
छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे – व्याख्याते गणेश शिंदे

अक्कलकोट : ( प्रतिनिधी )मनावर कंट्रोल पाहिजे. माणसाचे मन चंचल आहे.मनाला स्थिर करता आला पाहिजे. हे फक्त संताच्या चरणाजवळ शरण गेले की होऊ शकते. चांगले बोलता आले पाहिजे. संपत्ती किती आहे हे सांगु शकतो पण आपल्याकडे किती वेळ हे सांगु शकत नाही. आयुष्य क्षणभंगुर आहे. जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आपले सुखही आपले दुःख ही आपले राहिले नाही.छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे असे प्रतिपादन संभाजीनगरचे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे याने केले. येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक कार्यालयात मंगळवारीवारी दुसरे पुष्प गुंफताना छत्रपती संभाजीनगरचे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे ” जीवन सुंदर आहे या विषयावर बोलत होते.
विवेकानंद प्रतिष्ठानचे गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला सोमवार ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान दररोज सायं. साडेसहा वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले. अशोक येणगुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले चांगले, गोड बोलायला शिकलात तर आयुष्यातले निम्मे समस्या संपुन जातील. आनंद आपल्यातच आहे. आपण अंंर्तमनात डोकावले पाहिजे. आपण आपल्याला मिळालेला रोल चांगल्या पद्धतीने निभावला आहे. तुलना न करता आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे तरच आपले जगणे सुंदर होईल . आनंदी राहणे खुप सोपे आहे. आपण आनंदी आहोत हे दाखविणे अवघड आहे. येणाचे संकेत मिळतात जाण्याचे संकेत मिळत नाहीत. येताना जाताना काही घेऊन जायचे नाही हे निर्सागाचे नियम आहेत.त्यामुळे आनंदी राहण्यासाठी निर्सगाशी जुळवुन घ्या असे सांगताना छोट्या छोट्या उदाहरणातुन जीवन किती सुंदर हे सांगताना व्याख्याते गणेश शिंदे यांनी हसवत हसवत अंतमुर्ख केले.यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी, डाॕ.विपुल शहा, प्रा.ओमप्रकाश तळेकर, मुकुंद पत्की, गुरूपादप्पा आळगी चंद्रकांत दसले मल्लिनाथ आळगी आदीसह श्रोते उपस्थित होते.
