राजकीय

वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेला अक्कलकोट तालुक्यातील जनतेचा भरघोस प्रतिसाद – चंद्रशेखर मडिखांबे

     
  अक्कलकोट (प्रतिनिधी)-अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 8 सप्टेंबर पासून संपूर्ण तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आला होता त्याला अक्कलकोटच्या जनतेकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला. 
              ओबीसी समाजापर्यंत आरक्षणाचा महत्त्व आणि एससी एसटी आरक्षण विरोधात सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय आला त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्या साठी या जनसंवाद यात्रेचा आयोजन वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने करण्यात आला होता आठ तारखेपासून गोसावी वस्ती, सांगवी ,शिरसी, शिरवळ ,वागदरी ,भूरी कवटा, किरनळी , बदोला,कीणी, काझीकनबस, कुरनूर ,चुंगी ,हन्नूर, बराणपुर ,चपळगाव, अक्कलकोट स्टेशन ,शावळ, कर्जाळ ,कोन्हाली, हंजगी ,बॅगेहळी ,कडबगाव, दोड्याळ ,जेऊर ,हांद्राळ ,मुंडेवाडी, कुडल ,देवी कवठा ,बासलेगाव, कलप्पावाडी ,कंटेहळी ,बोरी उमरगे, मिरजगी, दुधनी ,सिन्नर ,नागुर, इब्रामपूर ,मुगळी ,संगोळगी, बनजगोळ, निमगाव ,गौडगाव, हत्ती कणबास, चिकेहली, इत्यादी गावात फटाके फोडून ढोल ताशा लावून जनतेने या जनसंवाद यात्रेचा स्वागत करण्यात आला हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात राहिलेले गाव पूर्ण करणार असून आरक्षण आपल्या हक्काचा आहे तो संपवण्याचा षडयंत्र सध्या चालू असून याबाबत जनजागृती या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात आली 8 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 पर्यंत गेले 20 दिवस हा जनसंवाद यात्रा सारखा पाऊस चालू असताना सुद्धा हा यात्रा सुरू होता पहिला टप्पा यशस्वी रित्या पार पडला, या जन संवाद यात्रेच्या माध्यमातून जनते सोबत एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा संवाद साधण्यात आला एस सी, एस टी च्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून वर्गीकरण करून आणि क्रिमिलियर लावून कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला यापुढे आरक्षण घेता येईल अशा पद्धतीचे अट सुप्रीम कोर्टाने घातल्यामुळे एससी एसटी चा आरक्षण संपविण्याचा षडयंत्र देशात आणि राज्यात आज चालू आहे या गोष्टीला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा विरोध आहे दोघेही मूग गिळून गप्प बसलेले आहे त्यामुळे ही जनसंवाद यात्रा काढावी लागली असे पत्रकारांशी बोलताना सोलापूर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी सांगितले, गरीब मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसींच ताट वेगळं आणि मराठा समाजाचा ताट वेगळा या दोघांना वेग वेगळ्या आरक्षण मिळाला पाहिजे अशी भूमिका प्रथम पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची राहिलेली आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात कोणीही वक्तव्य करायला तयार नाही त्यामुळे ओबीसीचा आरक्षण धोक्यात आलेला आहे याची जनजागृती या जनसंवाद यात्रेतून करण्यात आली
हा जनसंवाद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रविराज पोटे, माथाडी कामगार तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे तालुका महासचिव नागेश हरवाळकर जिल्हा संघटक देवानंद अस्वले युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, गंगाराम गायकवाड, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष संकेत शिरसे, सोमनाथ दसाडे,चिदानंद गाडेकर, युवक कार्यकर्ता गंगाराम वाघमारे, शहर उपाध्यक्ष सुनील शिंगे, महासचिव भारत देडे, तालुका संघटक बबन गायकवाड शहर युवक अध्यक्ष संदीप बाळशंकर, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, देविदास नडगम, भीम मडीखांबे, योगेश सोनकांबळे आनंद सोनकांबळे,शिवा नाटिकर, तालुका महासचिव गौतम गायकवाड तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड, रतन इंगळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button