Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतीचीं दुरावस्था

Admin by Admin
September 27, 2025
in सामाजिक
0
अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतीचीं दुरावस्था
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शेतकऱ्यांसमोर शेती दुरुस्तीचे आव्हान !
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने मोठे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतीची मोठी दुरावस्था झाली असून शेतकरी बांधवांसमोर आता शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे ठाकले आहेत .
अक्कलकोट तालुक्यातील दहा महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हजारो हेक्टर वरील खरीप पिके , फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित १० महसुली मंडळात शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत .अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बळीराजा अहवाल दिल झाला आहे. मागील ५० – ६० वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे वयोवृद्ध मंडळी सांगत आहेत. अतिवृष्टीचा फटका हा खरीप हंगामातील पिकांना जसा बसला आहे तसा तो शेतीलाही बसला आहे. अतिवृष्टीमुळे नदी , नाले , ओढे यांना महापुरा आला. या पुराचे पाणी हे शेतांमध्ये गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेतांमध्ये पाणी थांबले असून हजारो हेक्टर मधील शेती या नादुरुस्त झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतातील बांधा फुटून शेतातील माती वाहून गेली आहे .पुराच्या पाण्यामुळे शेतातील मातीही खरडून गेली आहे. अनेक गावात शेतीत पाणी शिरून बांध फुटून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुढील काळात या शेतीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना दोन-तीन वर्ष लागणार आहेत. शेतीच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीची मोठी दुरावस्था झाली असून आता शेतकरी बांधवांसमोर शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे राहिले आहे.
चौकट –
 शासन मदत करणार – अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यांना शासन हे मदत करणार आहे. यासाठी शेतीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
 चंद्रकांत मंगरुळे , तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट.
Previous Post

अक्कलकोटचा अभिमान : पद्मभूषण डॉ. सुधा मूर्ती यांचा थेट दूरध्वनीवरून धानय्य कौटगीमठ यांचे अभिष्टचिंतन

Next Post

गोळेगाव पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

Admin

Admin

Next Post
गोळेगाव पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

गोळेगाव पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156453
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697