शैक्षणिक

शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे याची संयुक्त जयंती साजरी

पुणे ( प्रतिनिधी )शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे याची संयुक्त जयंती कार्यक्रम पार पडला. शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात संयुक्त जयंती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. विलास आढाव, प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रा.डॉ गीता कल्याणी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थी सर्वांगित विकास, मानवी मूल्यांची रुजवणुक आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असतो, विभागाद्वारे असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात.

आजच्या कार्यक्रमात डॉ. विलास आढाव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले, महात्मा गांधीजी यांचे विचार आपण आपल्या वर्तनात आणून सक्षम मनुष्य निर्माण करू शकतो अशा साराचे मार्गदर्शन डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले, विचार आणि माहितीवर आपण होणाऱ्या शिक्षकांनी गंभीर विचार करून पुढे समाज परिवर्तनासाठी हातभार लावावा असं समारोपपर आवाहन त्यांनी विद्यार्थ्याना केला.

कार्यक्रमात 12 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आणि पूर्वनियोजन सहित कार्यक्रम यशस्वी पार पाडला, बी. एस.सी बी.एड, एम्.एड, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर वर्गातील 100+ विद्यार्थी , या व्यतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थीत होते.

शास्वतता,निसर्ग आराधना या महत्वाच्या बाबी विभागाकडून नेहमी समोर ठेवल्या जातात, वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात होणे या विभागाच्या परंपरा नेहमी एकमेव ठरतात.

आदरणीय, डॉ. गीता कल्याणी शिंदे यांनी विभागप्रमुख या नात्याने विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले, प्रत्येकवेळी नवीन विद्यार्थ्याना प्रेरित करून व प्रोत्साहित करून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व शिक्षक प्रेरित करतात आणि विभाग यासाठी सदैव तत्पर आहे, असं आपल्या वक्तव्यात त्या म्हणाल्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शिक्षक प्रतिनिधी राहुल गायकवाड आणि विद्यार्थी सम्राट पवार, संस्कृती देशपांडे,रागिणी ठाकरे, मानसी कुंभार यांनी केलेले असून विभागातील कार्यक्रम हे विद्यार्थ्याचेच असतात आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ते पार पाडले जातात.

सर्व सहभागी विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आभार प्रदर्शन नंतर या कार्यक्रमाची औपचारिकरीत्या सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button