सामाजिक
स्पष्ट व परखड बोलणारे माजी आमदार स्व.इनायतअली पटेल! – धर्मराज कडादी

इनायतअली पटेल स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचा गौरव!
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
चपळगाव समाजातील सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत हा उदात्त हेतू शिक्षण संस्थेची उभारणी केली. अल्पसंख्यांक असूनही निरपेक्ष वृत्तीने काम करण्याच्या शैलीमुळे इनायतअली पटेल जनता पक्षाकडून आमदार झाले. स्पष्ट व परखड बोलणारे होते असे उद्गार श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज कडादी हे चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय इनायतअली पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे तर प्रमुख पाहुणे धर्मराज काडादी हे होते. उपस्थितांचे स्वागत संस्था अध्यक्ष रविकांत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक. इसहाक पटेल यांनी केले. प्रारंभी इनायतअली पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार इनायतअली पटेल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशालेतील इयत्ता पाचवी ते अकरावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अनाथ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आंबा चिंच आवळा अशा वेगवेगळ्या शंभर रोपांचे वितरण करण्यात आले. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल अक्षरा म्हमाणे व सायली मेलगिरी यांचा गौरव करण्यात आला.पुढे बोलताना धर्मराज कडादी म्हणाले इनायतली पटेल व पी वाय पाटील यांनी ग्रामीण भागात शाळा काढून विद्यार्थ्यांना घडवून जे सेवेसाठी दिले ते समाजाला दिलेली देणगी होय. आज शाळा चालवणे हे कठीण झाले आहे अशाही परिस्थितीत चपळगाव ची शाळा ही उत्तम पद्धतीने चालू आहे यापुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षण देण्याचाही विचार करावा असे म्हणाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, इनायतअली पटेल हे दूरदृष्टीचे होते. ते आमदार असताना तालुक्याचा विकास व्हावा म्हणून कुरनूर धरणासाठी प्रयत्न केले त्यांची प्रेरणा घेऊनच ते पूर्णत्वास नेण्याचे काम आम्ही केले आज तालुक्यात हरित क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते इतकेच नव्हे तर उजनीचे पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येणार आहे. माणसानी दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे.
यावेळी सरचिटणीस प्राध्यापक प्रभाकर हंजगे, डॉक्टर काशिनाथ उटगे, मल्लिकार्जुन पाटील,अक्कलकोटचे वनपाल श्री. पवन आहेर साहेब,सिद्धार्थ गायकवाड,अंबण्णा भंगे,सद्दाम शेरीकर,अशपाक अगसापुरे,सिद्धाराम भंडारकवठे, गणेश कोळी,अबुजर पटेल , शोएब पटेल,अश्पाक बळुरगी, साजिद वळसंगकर मुख्याध्यापक संजय माने,शिवबाळ मूली,गुलाब बाणेगाव ,मनोज इंगुले,एजाज पटेल संजय बाणेगाव ,श्रावण गजधाने,सोमनाथ बानेगाव, खंडप्पा वाले,महादेव चव्हाण,ग्रामस्थ, सर्व गुरुजन वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर विजापुरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय माने यांनी मानले.
