देश - विदेश

निसर्गाचा नियम,सर्व धर्माची समानता आणि संविधानातील तत्त्वांचे पालन केल्यास भारत   विश्वगुरू बनणार.     – राष्ट्रीय संत पूज्य हवा मल्लिनाथ महाराज

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
      निसर्गाचा नियम, सर्व धर्मची समानता आणि संविधानातील तत्त्वांचे पालन देशातील सर्व नागरिकांनी केल्यास भारत देश लवकर विश्व गुरू बनणार असल्याची प्रतिपादन जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत  हवा मल्लिनाथ महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी महू येथे केले.
            राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जय भारत माता सेवा समितीच्या वतीने  मध्यप्रदेश येथील इंदोर जिल्ह्यातील आंबेडकर जन्मभूमी महू येथे  मोठ्या जल्लोषात भीम जयंती साजरी करण्यात आला. याप्रसंगी जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराजानी भक्तांना उपदेश केले. यावेळी बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला. तसेच आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाची शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला. या कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा तस्मिन पटेल, डॉ. हेमंतकुमार हिरोळे,  सिद्धार्थ तलावरे, दासराव हमबरडे, वैजनाथ झलकी,संदेश पवार, मल्लिकार्जुन सारडा, पप्पू पाटील, नागराजा चिटगुप्पा, डॉ.निलंगे, नामदेव बबलाद, आकाश बागवान, कापूरेबाई नांदेड, गिरीश तंबाखे सोलापुर, रेवप्पा ममदापुरे, संतोष बोणे, प्रकाश चलगेरी, अनिल जाधव, शिवनाथ जाधव सह हजारो देशभक्त सहभागी झाले होते.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देशभरातील हजारों देशभक्तांना उत्तर कर्नाटक शैलीतील पुरण पोळी, खीर, रोटी, सांबार आणि इतर अनेक गोड खाद्यपदार्थ महाप्रसादचा आस्वाद घेऊन हजारो देशभक्तांनी जल्लोष साजरा केला.
      समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ झलकी यांनी सांगितले की, राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात देशातील लोकांमध्ये देश भक्ती व एकता मजबूत करणेसाठी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश सह भारतातून हजारो देशभक्त  राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो किलोमीटरच्या प्रवास करीत देशभक्तीपर यात्रेत सहभागी झाले होते. या प्रसंगी पूज्य श्री हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या अमृत हस्ते विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट १
       देश सेवा हेच इश सेवा आहे. कोणीही जात, पात,धर्म,पक्ष यांच्या आधारावर लढू नये. आज प्रत्येकासाठी देश आणि राष्ट्रधर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. सर्व धर्मांमध्ये समानता असली पाहिजे. देशाला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सर्व भारतीयांनी एकरूप व्हावे, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. सर्वांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या भल्यासाठी झटले पाहिजे
  – राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज 
                  राष्ट्रीय अध्यक्ष
      जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button