Wednesday, September 9, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पाऊस गायब, पिके करपली! सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा – खासदार प्रणिती शिंदे

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 9, 2026
in सोलापूर
0
पाऊस गायब, पिके करपली! सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा – खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार प्रणिती शिंदेंची मागणी; मोहोळ तालुक्यात बांधावर जाऊन जळालेल्या पिकांची पाहणी

मोहोळ : -पावसाने दडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यात खरीप पिके संकटात सापडली असून, अनेक भागांत सोयाबीनसह अन्य पिके जळून जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

#खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील पाटकुळ, खुनेश्वर, डीकसळ आणि भैरववाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी करपलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जळून चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रत्येक गावातील नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेली पिके जळून जात आहेत. या संकटाच्या काळात मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार,” अशी ग्वाही प्रणिती शिंदे यांनी दिली.

#विकासकामांच्या मागण्याही मांडल्या

दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी विविध विकासकामांच्या मागण्या खासदार शिंदे यांच्यासमोर मांडल्या. शिरापूर उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करणे, खुनेश्वरला उजनीचे पाणी देणे, डीकसळ पुलाच्या कठड्याची दुरुस्ती आणि खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

रस्ता खराब असल्याने एस.टी. बससेवाही बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous Post

जन्मभूमी फाउंडेशनतर्फे दुधनी शहरासाठी  ‘स्वर्ग रथ’ (शव वाहिनी) सेवा सुरू

Next Post

दुग्धक्रांतीचे जनक कुरियन वर्गीस

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
दुग्धक्रांतीचे  जनक  कुरियन वर्गीस

दुग्धक्रांतीचे जनक कुरियन वर्गीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158649
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697