अक्कलकोट ( प्रतिनिधी )
उजनी धरणातील पाणी हे एकरूख सिंचन योजनेद्वारे डोबरजवळगे कुरुण तलाव व बोरेगांव पाझर तलाव याठिकाणी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी बोरेगाव येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले. बोरेगांव गावातील क्षेत्रात साठवण तलाव आहेत. पण त्यामध्ये पाऊस नसल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नाही. ते फक्त पावसावर अवलंबून आहेत. प्रत्येक वर्षाच्या अंदाजे या वर्षी पाऊस खुपच खूप कमी पडला असून आगामी पुढील काळात शेतकऱ्यासाठी, मुक्या प्राण्यांसाठी व गावकऱ्यासाठी पिण्या इतके ही पाणी मिळू शकणार नाही. या वर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने तलाव कोरडे आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकाऱ्याचे, मुक्या प्राण्यांचे व गावकाऱ्याचे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी उजनी धरणातील पाणी हे बोरेगाव व डोंबरजवळगे गावातील दोनही तलाव मध्ये आणणे आवश्यक आहे.
यासाठी बोरेगावच्या ग्रामस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले. तसेच अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून पाटील यांनी बोरेगाव तलावाची पाहणी करून ग्रामस्थानां व शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
यावेळी बोरेगावतील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.







