अक्कलकोट ( प्रतिनिधी )-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड यांचा संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी समर्थांची कोरीव मूर्ती व कृपावस्त्राने मान्यवरांचा सन्मान संपन्न झाला.यावेळी अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक,धार्मिक व भाविकाभिमुख सेवाकार्याचे दोन्ही मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अन्नछत्र मंडळाची आजवरची वाटचाल समाधानकारक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. पवार कुटुंबीयांचे श्री स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धास्थान असून अक्कलकोटशी भावनिक नाते असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भोसले परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हजारो भाविकांच्या निवास, भोजन व विविध सुविधांची प्रभावी व्यवस्था उभी केली असून, त्यातून भाविकांची मोठी सोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत, अक्कलकोटचे नाव देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यात मंडळाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. श्रद्धा, सेवा आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम अन्नछत्र मंडळाने घडवून आणल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी पालखी परिक्रमा प्रमुख संतोष भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी,मैनोद्दीन कोरबु, सरफराज शेख,प्रशांत शिंदे, महांतेश स्वामी,शिरू कुंभार,गोकुळ पाटील, संतोष माने,अशपाक काझी यांच्यासह अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी,सेवेकरी व भाविक उपस्थित होते.